शौर्यपदक सन्मानित वीर जवान प्रसाद बाजीराव थोरात यांचे दुःखद निधन
प्रमोद दांगट, आंंबेगाव (सजग वेब टीम)
मंचर | चांडोली बु. ता. आंबेगाव येथील कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून ओळख असलेले शौर्य पदक सन्मानित झालेले प्रसाद बाजीराव थोरात वय ३२ यांचा आजारपणामुळे दुःखद निधन झाले आहे
प्रसाद बाजीराव थोरात यांनी २००५ साली पुणे येथे केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दला मध्ये नोकरीची सुरवात केली , संपूर्ण कार्यकाळात १४ वर्षे सेवा केली असून,आसाम,बिहार,पुणे,मुबंई,ओरिसा,चेन्नई, हैदराबाद येथे त्यांनी सेवा केली असून आसाम मध्ये उल्फा आतंकवाद्या सोबत केलेल्या कामगिरी बद्दल त्यांना देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी शौर्यपदकाने त्यांचा सन्मान केला होता ड्युटीवर असताना ते आजारी पडले व दीड महिना ते शुश्रषा हॉस्पिटल शासकीय येथे दाखल होते पहाटे चार वाजता त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या मागे भाऊ गोरक्ष,पत्नी सारिका,आई शारदा असा परिवार आहे. त्यांच्यावर त्यांच्या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Leave a Reply