शिरुर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाण्याचा प्रश्न पेटला – विद्यमान खासदारांना फटका बसण्याची चिन्हे
शिरुर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाण्याचा प्रश्न पेटला
– विद्यमान खासदारांना फटका बसण्याची चिन्हे
सजग वेब टीम, शिरूर
शिरूर | शिरुर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाण्याचा प्रश्न ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पेटला आहे. त्यामुळे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
शिवाजीराव आढळराव पाटील सगल तीन वेळा खासदार होते. पैकी दोन पंचवार्षिकपासून हा भाग त्यांच्या मतदारसंघात जोडण्यात आला आहे. मात्र या भागात अद्याप पाण्याचा प्रश्न गंभीर आहे.
केंदूर आणि पाबळसह या भागातील १२ गावांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. पाणी नाही तर मतदान नाही, असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.
दरम्यान, शिरुरच्या पश्चिम पट्ट्यात आढळरावांना चांगलं मताधिक्य मिळतं, मात्र पाण्याचा प्रश्न पेटल्यामुळे नागरिकांच्या रोषाचा मोठा फटका आढळरावांना बसण्याची शक्यता आहे.
Leave a Reply