नोकरी, शिक्षण आणि बाजार…
नोकरी, शिक्षण आणि बाजार…
सजग संपादकीय
प्रगती, विकास ह्याचा विचार करावसं हल्ली कोणत्याच क्षेत्रातल्या प्रतिनिधींना वाटत नाहीये.
फक्त सगळ्यात जास्त तरुणांचा देश असं ओरडत सांगून कोणी महासत्ता होणार नसतं. आणि का व्हायचयं महासत्ता?
प्रगती, विकास ह्याचा विचार करावसं हल्ली कोणत्याच क्षेत्रातल्या प्रतिनिधींना वाटत नाहीये.
फक्त सगळ्यात जास्त तरुणांचा देश असं ओरडत सांगून कोणी महासत्ता होणार नसतं. आणि का व्हायचयं महासत्ता?
आपल्या लोकांना दोन वेळेच अन्न मिळून, त्यांच्या मुलभूत गरजा भागून सुखाने आयुष्य काढता यावे या सारखी ईतर कुठली सत्ता नसावी पण पैसा आणि त्या साठीची शर्यत यापुढे कोणालाच काही दिसत नाहीये. खुप मोठ्या मनुष्य बळाची आणि तांत्रिकतेची गरज आहे म्हणून लाखो engineers व्यवस्था निर्माण करतेय पण कंपन्याना काय हवयं याचा विचार न करता नुसतचं शिक्षणाचे धड़े गिरवले जातायेत. शिक्षणाच्या बाजारात लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. भरमसाठ फी आणि ईतर खर्चाने कावेबाजांचा व्यापार तर होतोय पण विदयार्थ्यांच्या भविष्याचं काय?
असं कोणतं शिक्षण पुरवलं जातय ज्या मुळे तुमच्या criteria मध्ये मुलं/मुली बसत नाहिये?
पदवीनंतर नोकरी मिळवून देऊ हा एक नवीन बाजार सुरु झालाय.
कोणतही शिक्षण घ्या, बाहेर बाजारबुणगे आहेच त्यांचंच किती प्रभावी शस्त्र आहे याची जाहिरात करायला. शिक्षणपद्धती कडून समाधान होत नसल्याने पालक आणि विद्यार्थी सुद्धा बाजारात नुकसान करून घेणारं गिऱ्हाईक बनत आहेत.
मिळत असलेलं शिक्षण आणि त्या पुढील टप्प्या वरची कामे यामधील अंतर खुप आहे. असं असून सुद्धा कोणत्या सचोटी वर तपासून कामास पात्र असं ठरवलं जात आहे हे काही कळेना.
विद्यार्थ्यांना सुद्धा कशालाच बळी न पड़ता खुप मोठ्या कसोटीवर उतरून हार न मानता लढत रहावे लागेल.
तेजल देवरे. – युवा लेखिका, नाशिक
Leave a Reply